शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी कोरड्या कालव्यात भजन -- बेडगला धरणे : पाणी न सोडल्याचा आंदोलनचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:02 IST

मिरज : म्हैसाळ योजनेचे थकीत बिल टंचाई निधीतून भरुन पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीदीच्या कार्यकर्त्यांनी बेडग (ता. मिरज) येथील हुलेगिरी फाट्यावरील टप्पा क्रमांक तीनच्या

ठळक मुद्देमिरज पूर्व भागात पाणी टंचाईने शेतातील पिके धोक्यात आली पाणी न सोडल्यास आंदोलन तीव्र करू, प्रसंगी मंत्र्यांना फिरकू न देण्याचा इशाराअन्य शेतकरी सहभागी झाल्यानंतर भजन म्हणत कोरड्या कालव्यामध्ये आंदोलनकर्ते उतरले

मिरज : म्हैसाळ योजनेचे थकीत बिल टंचाई निधीतून भरुन पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीदीच्या कार्यकर्त्यांनी बेडग (ता. मिरज) येथील हुलेगिरी फाट्यावरील टप्पा क्रमांक तीनच्या कोरड्या कालव्यामध्ये भजन आंदोलन केले. भर उन्हात सुमारे दोन तास आंदोलन सुरू होते. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ पाणी न सोडल्यास आंदोलन तीव्र करू, प्रसंगी मंत्र्यांना फिरकू न देण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

मिरज पूर्व भागात पाणी टंचाईने शेतातील पिके धोक्यात आली आहेत. पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता असल्याने प्रशासनाने योजनेचे थकीत बिल टंचाई निधीतून भरुन म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात यावे, या मागणीचे निवेदन काँग्रेस व राष्टÑवादीतर्फे तहसीलदारांना दिले होते. दहा दिवसात पाणी न सोडल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. मुदतीत पाणी सोडण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी बेडग येथील हुलेगिरी फाट्यावरलील टप्पा क्रमांक तीनच्या कोरड्या कालव्यामध्ये बसून भजन आंदोलन कले. अकराच्या सुमारास पंप हाऊसच्या आवारात शेतकºयांनी भजनाला सुरुवात केली. अन्य शेतकरी सहभागी झाल्यानंतर भजन म्हणत कोरड्या कालव्यामध्ये आंदोलनकर्ते उतरले. तेथे भर उन्हात ठिय्या मारून भजन सुरू केले.

सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. यावेळी सलगरचे सरपंच तानाजी पाटील म्हणालेकी, सध्या पिण्याच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न गंभीर बनत असल्याने म्हैसाळ योजना कार्यान्वित करावी, अशी निवेदनाव्दारे तहसीलदारांकडे मागणी केली होती. योजना सुरू करण्यासाठी दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलनाचा पाहिला टप्पा म्हणून भजन आंदोलन करण्यात आले. राज्य शासन बँक, देवस्थानांना हजारो कोटींचा निधी देते. उद्योगपतींचे कर्ज, व्याज माफ करते, मात्र म्हैसाळ योजनेचे ५ कोटींचे थकीत वीजबिल भरून म्हैसाळ योजना सुरू करीत नाही. शासनाने टंचाई निधीतून वीज बिल भरून योजना सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार आहे. माजी सभापती अनिल आमटवणे, खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, तानाजी पाटील, माजी सभापती दिलीप बुरसे, बाळासाहेब होनमोरे, सिध्दार्थ जाधव, अण्णासाहेब कोरे, बाळासाहेब नलवडे, सुरेश कोळेकर सहभागी होते. 

मंत्र्यांना फिरकू देणार नाहीआमदार सुरेश खाडे हे टंचाईतून पाच कोटींचा निधी मंजूर असल्याने योजना लवकरच सुरू होणार असल्याचे ते सांगत असले तरी,ती नेमकी कधी सुरू होणार, हे मात्र ते सांगत नाहीत. आ. खाडे हे खोटे बोलून शेतकºयांची दिशाभूल करीत आहेत. भाजपचे सरकार असल्याने त्यांनी म्हैसाळ योजनेचा थकीत बिलाचा प्रश्न निकालात काढून योजना सुरू करावी, शेतकºयांच्यावतीने आम्ही त्यांचा चांदीचा गदा देऊन सत्कार करू, योजना सुरू करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाल्यास भाजपच्या मंत्र्यांना भागात फिरकू देणार नसल्याचा इशारा माजी सभापती अनिल आमटवणे व सलगरेचे सरपंच तानाजी पाटील यांनी दिला.

टॅग्स :DamधरणSangliसांगली